Shravan Bal Yojana: मित्रांनो तुम्ही श्रावण बाळ योजना हे नाव नक्की एकाने असेल, परंतु याच योजनेला सेवा राज्य निवृत्ती वेतन योज़ना या अधिकृत नावाने सुद्धा ओळखले जाते. हि योजना महाराष्ट्रातील वृद्ध नागरिकांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरु करण्यात आली असून दरवर्षी लाखो नागरिक या योजनेचा लाभ दर महिन्याला घेत असतात.
योजनेचे उद्देश
राज्यातील जेष्ठ आणि वृद्ध नागरिकांना जीवन जगण्यासाठी आणि उदरनिर्वाह करण्यासाठी पेन्शन स्वरूपात आर्थिक मदत करणे हाच या योजनेमागिल हेतू आहे.
योजनेचे फायदे
योजनेमार्फ़त जे पात्रता निकष लादण्यात आलेले आहेत त्यामध्ये बसणाऱ्या वृद्ध नागरिकांना 600 ते 1,500 पर्यंत आर्थिक मदतमिळते. दर महिन्याला मिळणारे पैसे हे डायरेक्ट बँकेत जमा केले जाते, त्यामुळे कोणापुढे हात पसरवण्याची गरज नाही आणि जेव्हा हवे तेव्हा संबंधित लाभार्थी ते पैसे काढू शकतील. राज्यातील वृद्ध नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील छोट्या मोठ्या गरज पूर्ण करण्यास मोठा आधार होईल.
योजनेच्या पात्रता अटी
महाराष्ट्रातील 65 पेक्षा जास्त वयाचा असलेला अर्जदाराला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच त्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 21,000 पेक्षा जास्त असू नये. नाहीतर त्याला अपात्र केले जाईल. अर्जदार व्यक्ती हा जर का या योजनेव्यतिरिक्त इतर कुठल्या पेन्शन योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळाणार नाही.
योजनेसाठी लागणारी कागदात्रे
- आधार कार्ड
- रहिवासी पुरावा
- वयाचा पुरावा
- उत्पन्नाचा दाखला
- बँकेचे पासबुक झेरॉक्स
अर्ज प्रक्रिया
Shravan Bal Yojana साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑफलाईन अर्ज कार्याचा असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्हयाचा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामध्ये जाऊन फ्रॉम भरावा लागणार आहे. तसेच सोबत आपण वरती बघितलेले कागदपत्रे सुद्धा सबमिट करावे लागतील. पात्र झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यात महिन्याला पेन्शन जमा होत जाणार.
Also Read: Shravan Bal Yojana Online Apply: या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार 1500 रुपये महिना
जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला खालील बॉक्स मधील Apply Now या बटनावर क्लिक करून अर्ज करता येते.
| श्रावण बाळ योजना 2025 | Apply Now |
महत्वाची टीप
मित्रांनो जर तुमच्या घरातील कोणी सदस्य या योजनेसाठी पात्र झाले असतील तर त्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक आहे नाहीतर पगाराची रक्कम थांबून ठेवण्यात येत असते. सोबतच सहा महिन्यातून एकदा EKYC करणे सुद्धा आवश्यक असेल. तेव्हाच दर महिन्याला, कुठंही ना अडकता, योजनेचा लाभ मिळेल.
निष्कर्ष
मित्रांनाही जसे जसे वय वाढत जाते वेगळ्या वेगळ्या बिमारी सुद्धा वाढत जातात. त्याचे औषधें आणि इतर गरज या मिळणाऱ्या पेन्शन मधू होऊ शकतात. राहिला जेवण खावं करण्याचा प्रश्न तर ते कुटुंबातील मुलं, बाळ देतातच. परिवाराव जास्त ओझं म्हातारपणी होण्याचे नसेल तर हि योजना अत्यंत उपयुक्त आहे, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.