Kisan Mandhan Yojana: भारत सरकारने देशातील शेतकऱ्यांना दिवाळीचे गिफ़्ट म्हणून मोठी घोषणाकेली आहे. आपला देश हा कृषी प्रधान देश असून देशातील शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा सुद्धा बोलले जाते. परंतु काही वर्षांपासून या जगाच्या पोशिंद्याकडे मोठ्या प्रमाणात शासनाचे दुर्लक्ष होत होते. यावर्षी पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्र मध्ये अतिवृष्टीतमुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान, ज्यामुळे कोट्यवधी नागरिकांना भूखमरीची वेळीसुद्धा येऊ शकते. म्हणून केंद्रसरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मोठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी सर्वात मोठा निर्णय Kisan Mandhan Yojana आहे असे म्हणायला काहीवच हरकत नाही.
Kisan Mandhan Yojana काय आहे?
मित्रांनो, किसान मानधन योजना अर्थात “पंतप्रधान किसान मानधन योजना” होय. ज्या प्रमाणे केंद्रसरकारने प्रधानमंत्री किसान योजना राबवून वर्षाचे सहा हजारांचे अनुदान पात्र शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली आहे. त्याच पद्धतीने या योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांना दिला जाईल, परंतु हा हाभ 3 हजार रुपये असून दर महिन्याला अल्पभूदारक शेतकऱ्यांना मिळणार आहे.
म्हणजेच वर्षाचे 36,000 हजार रुपये वृद्धपकाळात शेतकऱ्यांना केंद्रसरकार देत आहे. शेतकरी बांधवांनो आता तुम्ही जावं आहात तुमच्याकडून काम होते, परंतु वय झाल्यावर मात्र जागेवरून उठायला मुश्किल जात. म्हणून शासनाच्या या योजनेमध्ये थोडे पैसे गुंतवले तर त्याच्या दुप्पट 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयस्कर झाल्यावर महिन्याला 3 हजार रुपये. ज्यामुळे पुढील जीवन जगण्यास शेतकऱ्यांना कुठलीही आर्थिक अडचण येणार नाही.
योजनेचे उद्देश
मित्रांनॊ आजकाल, 50 व्यावर्षापासूनच सर्वसामान्य नागरिक दुखण्यापासून त्रस्त होतोय. तरी आपला शेतकरी बांधव हा रात्र दिवस जीव असेपर्यंत शेतात राबतो. त्यांच्या वर्षीपकल्ल त्यांना कष्ट करण्याची गरज पडू नये म्हणून या योजनेच्या माध्यमातून पेन्शन स्वरूपात लाभ देणे, हेच या योजनेमागील उद्देश आहे.
योजनेचे फायदे
पात्र शेतकऱ्यांना 60 वर्ष वय झाल्यावर दर महिन्याला पेन्शन स्वरूपात 3,000 रुपये मिळणार. म्हणजेच प्रति वर्ष 36,000 हजार दिले जातील. ज्यामुळे वृद्धकाळात सुद्धा शेतकरी हा स्वावलंबी जीवन जगू शकेल. त्याच्या औषधोपचार किंवा उदरनिर्वाहाच्या खर्चासाठी कोणालाही पैसे मागायची गरज पडणार नाही. जर तुम्ही लवकर या योजनेत नोंदणी केली तर तुम्हला माडे चांगला लाभ मिळेल. जेवढे तुम्हीच पैसे भरणार त्याच्या दुप्पट रक्कम शासन तुम्हाला तुमच्या वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यावर पेन्शनच्या स्वरूपत प्रत करणार. ज्यामुळे पुढी राहिलेले जीवन आनंददायी जाईल.
योजनेच्या पात्रता अटी
अर्जदार हा भारत देशातील शेतकरी असावा. तसलेच तो एक अप्लाभुदरक शेतकरी असणे अति आवश्यक असेल. ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड बँकेशी संलग्न असेल, त्यांनाच योजनेचा अर्ज करता येईल. हा अर्जदाराचे वय 18-40 च्या असेल दरम्यान असेल तरच अर्ज करता येईल. तुम्हाला वयाच्या साथ वर्ष ननंतरच याचा लाभ मिळेल याची नोंद घ्यावी.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँकेचे पासबुक
- जन्माचा दाखला/टीसी
- पासपोर्ट फोटो
- सुरु मोबाईल नंबर
- शेतीचा 7/12 उतारा
योजनेचा अर्ज कुठे करायचा?
Kisan Mandhan Yojana चा अर्ज करण्यासाठी तुम्हला तुमच्या परिसरातील CSC सेंट ला भेट द्यावी लागेल. तिथे सव्र्ह कागदपत्रे घेऊन जाऊन गेलुयावर तेथील व्यक्ती तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करून देईल.
निष्कर्ष
शेतकऱ्यांना आता म्हातारपणाची चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण त्यांच्या म्हातारपणाचा विचार स्वतः केंद्रसरकारने करून ठेवला आहे. त्यामुळे या योजनेचा लवकरात लवकर अर्ज करा आणि वृद्धकाळ आरामात जीवन जगा. अधिक माहितीसाठी आम्हाला व्हाट्स अप ला जॉईन करा.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.